Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; नुकसान भरपाईसाठी मिळणार विमा कवच

Palghar News : चिकूचे उत्पादन घेताना अनेकदा जास्त पाऊस, अधिक उन्हाची तिव्रता यामुळे चिकूचे नुकसान होत होते. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन देखील याची भरपाई मिळत नव्हती

रुपेश पाटील

पालघर : चिकू हा नाशवंत फळ असल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांना अतिपाऊस आणि अति ऊन, हवामानातील आर्द्रता याचा मोठा फटका बसत असतो. मात्र चिकू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला असून हवामान बदलामुळे चिकूचे नुकसान झाल्यास त्याला विमा कवच देण्यात आले आहे. 

चिकूचे उत्पादन घेताना अनेकदा जास्त पाऊस, अधिक उन्हाची तिव्रता यामुळे चिकूचे नुकसान होत होते. यात (Farmer) शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन देखील याची भरपाई मिळत नव्हती. यामुळे चिकू उत्पादक शेतकऱ्यांना विमा कवच देण्यात यावे, तसेच चिकू विम्याची हेक्टरी हप्ता पूर्ववत करून ३५०० करावी; अशी मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केली होती. यावर कृषीमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा 

चिकू पिकाला विमा (Crop Insurance) कवच मिळावे याबाबत आमदार मनीषा चौधरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत केले होती. यावर सरकारने तातडीने उपाययोजना करत ही मागणी मान्य केली आहे. सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे हजारो चिकू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT