तबरेज शेख
नाशिक : जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यानी कर्ज घेतले आहे. दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाचक वसुली विरोधात कर्जदार शेतकऱ्यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गोल्फ क्लब मैदान येथून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना शेती कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. मात्र शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांना कर्ज फेड करता येणे शक्य होत नाही. दरम्यान नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरु करण्यात आली आहे. या विरोधात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत कर्ज वसुली थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
अशा करण्यात आल्या मागण्या
एनडीसीसी बँकेने सुरू केलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवण्यात यावी. एनडीसीसी बँकेने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सातबारावर कब्जेदारी सदरी लावलेल्या सोसायटीच्या व बँकेच्या नावाच्या नोंदी त्वरित रद्द करण्यात याव्या. व्याज आकारणी करताना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे एनपीए तरतूद लागू करावी. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना एनडीसीसी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना ही लागू करावी व शेतकऱ्यांना दिलेली सूट राज्य सरकारने भरून बँकेला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी.
तर महाराष्ट्रात विराट मोर्चा
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे पालन करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी; या मागणीचे निवेदन घेऊन शेतकऱ्यांनी गोल क्लब या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या जर मान्य नाही केल्या, तर येथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रात विराट मोर्चा काढण्यात येईल असा इशारा समस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.