sugar factory 
ऍग्रो वन

साखर कारखान्‍याची राख; शेतातील पिकांवर होतोय परिणाम

साखर कारखान्‍याची राख; शेतातील पिकांवर होतोय परिणाम

दिनू गावित

नंदुरबार : आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याच्या चिमनीमधुन उडाणाऱ्या राखेमुळे आजबाजुच्या शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. यामुळे परिसरातील संतप्त झालेले शेतकरी (Farmer) आंदोलनच्या पवित्र्यात आहेत. (nandurbar-news-Sugar-factory-ash-Impact-on-field-crops)

नंदुरबार जिल्ह्यातील आयान मल्टीट्रेड साखर कारखाना (Sugar Factory) पुन्हा एकादा टिकेचे लक्ष झाला आहे. या साखर कारखान्याच्या चिमनीमधुन उडाणाऱ्या राखेमुळे आजबाजुच्या शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या राखेमुळे कपाशी, मिर्ची, आणि पपईचे पीक काळवंडत असुन त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या कमी भावाचा भुरदंड हा परिसरातील शेतकऱयांना सोसावा लागत आहे.

कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष

काही दिवसांपुर्वी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर पडलेल्या धाडीमध्ये या कारखान्याचा देखील समावेश होता. शेतकरी यांनी कारखाना प्रशासनाकडे याबाबत गेल्या तीन वर्षांपासुन तक्रार करुन देखील कारखाना प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आता संतप्त शेतकरी आंदोलनच्या पवित्र्यात आहे. याबाबत साखर कारखाना प्रशासना सोबत संवाद साधला असता त्यांच्याकडुन अद्यापही कोणताही खुलासा आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT