Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : काढणीला आलेल्या भात पिकाच्या शेतात पाणीच पाणी; अवकाळी पावसामुळे फटका

Nandurbar News ; हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टानंतर नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीसाठी (Nandurbar) आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याचा फटका बसला आहे. यात काढणीला आलेल्या भात पिकाच्या शेतात पाणीचपाणी साचले आहे. यामुळे (Farmer) शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. (Live Marathi News)

हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टानंतर नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे मोठं नुकसान झालं असून नवापूर तालुक्यातील देवलीपाडा परिसरात भात शेतीत पाणी गेल्याने भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या भात शेतीत पाणी गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी; अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजून तीन दिवस पावसाचा जोर कायम
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून काढणीसाठी आलेला कापूस, भात आणि केळी पिकाला अवकाळी पाऊस वादळवाऱ्याचा फटका बसला आहे. वेचणीसाठी कापूस तयार होता, मात्र पावसात भिजल्याने तो खराब झाला आहे. तर दुसरीकडे कापणीला आलेला भात आणि कापून ठेवलेला भात दोघेही खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावे असे मागणी शेतकऱ्यांनी केले आहे अजून तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT