शेतकऱ्यांसमोर पुन्हा अळीचे संकट !
शेतकऱ्यांसमोर पुन्हा अळीचे संकट ! जयेश गावंडे
ऍग्रो वन

शेतकऱ्यांसमोर पुन्हा बोंड अळीचे संकट !

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यात पुन्हा बोंड अळीने डोके वर काढले असून बोंडअळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यासह राज्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटातून बाहेर पडत नाही तोच आता जिल्ह्यात कपाशीवरील बोंडअळीचे गडद संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे.

हे देखील पहा -

कपाशीवरील बोंड अळीने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अकोला जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळी आली आहे. त्यामुळे बोंड अळीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

गेल्या चार पाच वर्षांपासून बोंडअळीचे संकटामुळे शेतकरी हतबल झालाय. विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हे संकट यावर्षी पुन्हा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बीटी कपाशीमध्ये बोंडअळीला प्रतिबंधक जीन आहे. असे असताना अलीकडच्या पाच-सहा वर्षांत बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने बीटी कपाशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चार वर्षांपूर्वी गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणाने ४० टक्केच्या वर कापूस पिकाचे नुकसान केले होते. त्यानंतर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून, नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले. पण ही बोंडअळी समूळ नष्ट झाली नाही. यावर्षी पुन्हा बोंडअळीने तोंड वर काढले असून, विदर्भातील वर्धा, अमरावती व अकोला जिल्ह्यातील काही भागातील अनेक गावात बोंडअळीने पिकांना घेरायला सुरुवात केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

SCROLL FOR NEXT