Kalyan Crime
Kalyan Crime Saam tv
ऍग्रो वन

Kalyan Crime : शेतीच्या वादातून कुटुंबाला मारहाण; शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघेजण ताब्यात

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: शेतीचा वाद उफाळून आल्याने या वादातून एका गटाकडून शेतकरी कुटुंबांला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना (Kalyan) कल्याण तालुक्यातील रुंदे आंबवली गावात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेतकरी चांगदेव बनकर यांचा उपचारादरम्यान (Death) मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

कल्याण तालुक्यातील रुंदे आंबिवली गावात चांगदेव बनकरे, पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांची दोन मुले दुग्ध व्यवसाय आणि शेती करतात. यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. ५ एप्रिलला चांगदेव बँकरे यांची पत्नी उषाबाई बनकरे शेतात असताना त्यांचे नातेवाईक बाळाराम टोके यांनी आमच्या शेतीत तू काय करते तू इथून निघून जा असे सांगितले. उषाबाईने घडला प्रकार तिच्या मुलांसह पतीला सांगितला. यानंतर (Farmer) चांगदेव आणि त्यांचे कुटुंबीय बाळारामला जाब विचारण्यासाठी गेले असता चांगदेव आणि बाळाराम यांच्यात वाद झाला. या वादात बाळाराम टोके त्यांची मुले इतर सहा ते सात जणांनी बनकरे कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मारहाणीत चांगदेव बनकरे त्यांची पत्नी उषाबाई आणि दोन मुले तसेच काका जखमी झाले. यानंतर चांगदेव यांना गंभीर अवस्थेत टिटवाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी (Police) आधी दोन जणांना अटक केली होती. मात्र चांगदेव बनकरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात नऊ आरोपी असून सर्व आरोपींना जोपर्यंत अटक करीत नाही. तोपर्यंत चांगदेव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. सदर प्रकरणात सागर टोके, अमित टोके आणि प्रल्हाद टोके यांना अटक केली आहे. अन्य सहा आरोपींना अटकेचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर चांगदेव कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT