Jalgaon News Kharif Hangam Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या पेरण्या केवळ १५ टक्के

अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या पेरण्या केवळ १५ टक्के

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुंबई, पुणे येथे चांगला पाऊस पडत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९२.४ मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. जून महिना उलटून जुलै सुरू झाला, तरी अद्यापपर्यंत पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. तरी देखील काही शेतकऱ्यांनी (Farmer) खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत केवळ १५ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. (Maharashtra News)

जून महिन्याचे २६ दिवस पावसाअभावी कोरडे गेले. नंतर थोडाफार पाऊस झाला. मात्र, दमदार पावसाची अद्याप प्रतिक्षा आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरण्या केल्या. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आता पाऊस येईल, या आशेवर कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरण्यांना सुरवात केली आहे.

१५ जुलैपर्यंत पेरण्या करता येतील

उडीद, मूग वगळता कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर या पिकांच्या पेरणया १५ जुलैपर्यंत करता येतील. आता मात्र पावसाने वेग घेतला पाहिजे. किमान आगामी आठ दिवसांत दमदार पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्या पूर्ण होतील, अशा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT