Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News : पुराच्या पाण्यात शेतीचे नुकसान; कर्जफेडीच्या विवंचनेत तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Hingoli News : राजू यांच्या कडे दोन एकर शेती होती. त्यांनी शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.

संदीप नागरे

हिंगोली : मराठवाड्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. दरम्यान आज हिंगोलीत पुन्हा एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिंगोलीच्या पिंपळखुटा गावात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

राजू गाताडे (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा गावातील रहिवाशी होते. राजू यांचे मागील महिनाभरापूर्वी पुराच्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. राजू यांच्या कडे दोन एकर शेती होती. त्यांनी शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. मात्र मागील महिन्यात गारपीट व अतिवृष्टी झाल्याने झाल्याने राजू यांच्या शेतात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे होते. यामुळे शेतीतून उत्पन्न चांगले येईल याची आशा मावळली होती. 

त्यातच पेरणी करण्यासाठी बँकेतून कर्ज काढले होते. बँकेचे हे कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत असलेल्या राजू यांनी रेल्वेच्या समोर उडी घेत प्राण संपविले आहेत. दरम्यान या घटनेमुळे राजू यांचे कुटुंब रस्त्यावर आले असून घरातील कमावता व्यक्ती गेल्याने संसार देखील उघड्यावर पडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार! Fitment Factor पासून Pay Matrix पर्यंत 5 मोठे अपडेट

Maharashtra News Live Update : अमित शाह कधीही पंतप्रधान होणार नाही: Sanjay Raut यांचा मोठा दावा

Singer Death : संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; प्रसिद्ध गायिकेचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Fatty Liver : फॅटी लिव्हरसाठी वरदान ठरतील 'ही' ३ फळे, कधी अन् कशी खायची?

Mumbai : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचललं, खळबळजनक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT