अवकाळी पावसाने बळीराजाच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला; ग्रामीण भागात भात पिकांच्या झोरी पावसाने भिजल्या...  प्रदीप भणगे
ऍग्रो वन

अवकाळी पावसाने बळीराजाच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला; ग्रामीण भागात भात पिकांच्या झोरी पावसाने भिजल्या...

परतीच्या पावसाने शेतात चिख्खल झाले असतानाही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी भात पिके कापून घेतली

प्रदीप भणगे

डोंबिवली : गुरुवारी दुपारच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. परतीच्या पावसाने शेतात चिख्खल झाले असतानाही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी भात पिके कापून घेतली आहेत. मात्र, असे असताना कल्याण ग्रामीण भागासह मलंगगड भागातील शेतकऱ्यांनी सणासुदीच्या कालखंडात शेतात चिख्खल असल्याने, भाताच्या झोरी तयार करून शेतात ठेवल्या आहेत.

हे देखील पहा-

मात्र मागील २ दिवसांपासून पाऊस ही पडण्याची शक्यता निर्माण केली असताना अचानक गुरुवारी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली आहे. कल्याण ग्रामीण भाग आणि मलंगगड भागातील अनेक गावांमध्ये अचानक गुरुवारी दुपारी पावसाची संततधार सुरु झाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी घरात असलेल्या प्लॅस्टिकच्या कापडाने भात पिकांना आधार देण्याचे काम केले आहे.

मात्र, घराजवळ असलेल्या शेतकऱ्यांना भात पीक ही पावसापासून भिजवण्यातून काही प्रमाणात यश आले असले, तरी अनेक शेतकऱ्यांची पिके अजून शेतातच आहेत. त्यामुळे पार्टीच्या पावसाने केलेल्या हंगामानंतर आता पुन्हा अवकाळी पावसाने बळीराजावर वक्रदृष्टी दाखवण्यास सुरुवात केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतात अनेक ठिकाणी पीक बाहेर काढता येत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातच पीक ठेवली आहेत. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भाग आणि कल्याण ग्रामीण भागातील १४ गावातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान भात पीक वाचवण्याकडे लागले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT