Farmers Sowing  Saam TV
ऍग्रो वन

शेतकऱ्यांनो... पेरणी कधी कराल?; अकोला कृषी विद्यापीठाने दिला महत्वाचा सल्ला

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विद्यापीठाचे म्हणणे आहे.

अॅड. जयेश गावंडे

मुंबई : जून महिना निम्मा संपत आला तरी, अद्यापही मान्सून हवा तसा महाराष्ट्रात स्थिरावलेला नसल्याचं चित्र आहे. ढगाळ वातावरण निर्माण होत आहे, सोसाट्याचा वाराही सुटत आहे, पावसासाठी पूरक वातावरणही तयार असूनही पावसाच्या सरी काही बरसताना दिसत नाहीत. थोडक्यात काय, तर यंदाचा मान्सून लांबला नसला, तरीही त्याचा वेग मात्र मंदावल्याचं स्पष्ट होत आहे. अशातच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करायला नको असा सल्ला अकोल्यातील कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

पावसाचे उशिरा होणारे आगमन, पाऊस आल्यानंतर पडणारा खंड यामुळे पेरणी व पिके वाया जाऊन श्रम आणि आर्थिक फटका शेतकरी बांधवांना बसतो. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असा सल्ला अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता 80 ते 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. असं कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

येत्या 2 दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एकीकडे पावसानं तग धरलेला नसताना, वरुणराजा स्थिरावल्याशिवाय पेरणीची घाई करू नका, असा मोलाचा सल्ला हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. पुरेसा पाऊस झाल्यास खंड पडला तरी पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विद्यापीठाचे म्हणणे आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT