कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले; दरात घसरण Saam Tv
ऍग्रो वन

कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले; दरात घसरण

मार्केटमध्ये भाव जास्त नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : बटाटा आणि कांद्याच्या किरकोळ भाव चांगल्याच वधारल्या आहेत. तसे पाहिल्यास ठोक मार्केटमध्ये भाव जास्त नाही. परंतु, माल खराब निघत असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी भाव वाढविले आहेत. यामुळेच ठोकमध्ये २०-३५ रुपये किलो विकणारा कांदा हा किरकोळ बाजारात ५०-६० रुपयांवर विकले जात आहे. बटाटेच देखील जवळपास अशीच परिस्थिती आहे.

हे देखील पहा-

व्यापाऱ्यांच्या मते, कांद्याचे नवीन पीक बाजारात आल्यानंतरच स्थितीत सुधारणा दिसून येणार आहे. आलू- कांदा विक्रेत्यांनी सांगितले की, कळमना मंडीत सरासरी १५ ट्रक मालाची आवक होत आहे. बाजाराच्या दिवशी ही आवक ३५-४० गाड्यांपर्यंत पोहोचत आहे. आवक कमी नाही, मात्र माल खराब येत आणि होत आहे. कळमना मंडीत कांद्याच्या भावामध्ये २० ते ३५ रुपयापर्यंत आहे. ३५ रुपयेवाला माल चांगल्या दर्जाचा आहे.

कमी किमतीवाले ५० किलोच्या बोरीत १५ ते २० किलो माल खराब निघत आहे. भाववाढीचे हेच मुख्य कारण आहे. कळमना मार्केटमध्ये बटाट्याची भरपूर आवक होत आहे. बाजारात बटाट्याचे भाव १० ते १२ रुपये प्रतिकिलो आहे. परंतु, किरकोळ बाजारात बटाटा ३० रुपयाच्या खाली मिळत नाही. आलूमध्ये खराब माल येण्याचीही तक्रार नाही. किरकोळमध्ये जाणीवपूर्वक भाव वाढविले जात आहे. यामुळे आलूही ग्राहकांना महागच मिळत आहे. बाजारातील भावावर नियंत्रण मिळविण्याची कोणतीही ठोस प्रणाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT