कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले; दरात घसरण Saam Tv
ऍग्रो वन

कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले; दरात घसरण

मार्केटमध्ये भाव जास्त नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : बटाटा आणि कांद्याच्या किरकोळ भाव चांगल्याच वधारल्या आहेत. तसे पाहिल्यास ठोक मार्केटमध्ये भाव जास्त नाही. परंतु, माल खराब निघत असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी भाव वाढविले आहेत. यामुळेच ठोकमध्ये २०-३५ रुपये किलो विकणारा कांदा हा किरकोळ बाजारात ५०-६० रुपयांवर विकले जात आहे. बटाटेच देखील जवळपास अशीच परिस्थिती आहे.

हे देखील पहा-

व्यापाऱ्यांच्या मते, कांद्याचे नवीन पीक बाजारात आल्यानंतरच स्थितीत सुधारणा दिसून येणार आहे. आलू- कांदा विक्रेत्यांनी सांगितले की, कळमना मंडीत सरासरी १५ ट्रक मालाची आवक होत आहे. बाजाराच्या दिवशी ही आवक ३५-४० गाड्यांपर्यंत पोहोचत आहे. आवक कमी नाही, मात्र माल खराब येत आणि होत आहे. कळमना मंडीत कांद्याच्या भावामध्ये २० ते ३५ रुपयापर्यंत आहे. ३५ रुपयेवाला माल चांगल्या दर्जाचा आहे.

कमी किमतीवाले ५० किलोच्या बोरीत १५ ते २० किलो माल खराब निघत आहे. भाववाढीचे हेच मुख्य कारण आहे. कळमना मार्केटमध्ये बटाट्याची भरपूर आवक होत आहे. बाजारात बटाट्याचे भाव १० ते १२ रुपये प्रतिकिलो आहे. परंतु, किरकोळ बाजारात बटाटा ३० रुपयाच्या खाली मिळत नाही. आलूमध्ये खराब माल येण्याचीही तक्रार नाही. किरकोळमध्ये जाणीवपूर्वक भाव वाढविले जात आहे. यामुळे आलूही ग्राहकांना महागच मिळत आहे. बाजारातील भावावर नियंत्रण मिळविण्याची कोणतीही ठोस प्रणाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

इबोलाचा उद्रेक; मृतांचा आकडा ३,००० च्या पार, WHO ने दिला मोठा इशारा

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Ayodhya Ram Temple Trust New CEO: राम मंदिराचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा कोण आहेत?

SCROLL FOR NEXT