पावसाअभावी खरीपाची पिके सुकू लागली; बळीराजा चिंतेत! गोविंद साळुंके
ऍग्रो वन

पावसाअभावी खरीपाची पिके सुकू लागली; बळीराजा चिंतेत!

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

शिर्डी : राज्यभरात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याचश्या भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राहाता तालुक्यामध्ये पावसाभावी खरिपाची पिके सुकू लागली आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता तालुक्यात पाऊसच पडला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

हे देखील पहा -

खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यात साधारणतः पाच टक्क्यांच्या आसपास खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र पावसाने तब्बल पंधरा दिवस विश्रांती घेतल्या नंतर हि पिके सुकू लागली आहेत. याच कालावधीनंतर मध्यम स्लावरूपाचा पाऊस या भागात झाला. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. सोयाबीन, मका, कपाशी, मूग व अन्य पिके जोमात आली.

मात्र आता पुन्हा पावसाने दांडी मारल्याने राहाता तालुक्यातील खरीपातील हि पिके सुकून जाऊ लागली आहेत. दरम्रोयान रोज या भागात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र, पावसाची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. येत्या आठवड्याभराच्या काळात पाऊस झालाच नाही तर जोमात आलेली हि पीके वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT