पावसाअभावी खरीपाची पिके सुकू लागली; बळीराजा चिंतेत! गोविंद साळुंके
ऍग्रो वन

पावसाअभावी खरीपाची पिके सुकू लागली; बळीराजा चिंतेत!

राज्यभरात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याचश्या भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

शिर्डी : राज्यभरात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याचश्या भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राहाता तालुक्यामध्ये पावसाभावी खरिपाची पिके सुकू लागली आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता तालुक्यात पाऊसच पडला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

हे देखील पहा -

खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यात साधारणतः पाच टक्क्यांच्या आसपास खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र पावसाने तब्बल पंधरा दिवस विश्रांती घेतल्या नंतर हि पिके सुकू लागली आहेत. याच कालावधीनंतर मध्यम स्लावरूपाचा पाऊस या भागात झाला. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. सोयाबीन, मका, कपाशी, मूग व अन्य पिके जोमात आली.

मात्र आता पुन्हा पावसाने दांडी मारल्याने राहाता तालुक्यातील खरीपातील हि पिके सुकून जाऊ लागली आहेत. दरम्रोयान रोज या भागात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र, पावसाची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. येत्या आठवड्याभराच्या काळात पाऊस झालाच नाही तर जोमात आलेली हि पीके वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT