Farmer Saam tv
ऍग्रो वन

पाण्याविना सुकताय पीक; भारनियमनाचा फटका

पाण्याविना सुकताय पीक; भारनियमनाचा फटका

भूषण अहिरे

धुळे : लोडशेडिंगचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. विहिरीत मुबलक पाणी असताना देखील फक्त लाईट नसल्यामुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नसल्याने पाण्याविना पीक (Dhule News) सुकण्याची वेळ आली आहे. (dhule news Crop drying without water Load shedding impact)

बाजरी, कांदा (Onion) ही पिके हातातोंडाशी आलेली असताना उन्हाचा तडाखा अशातच या पिकांना पाणी देता येत नसल्याने पाण्याविना ही पीक शेतातच सुकत चालली आहेत. 24 तासात जवळपास 17 ते 18 तास लाईट नसल्याने शेतकऱ्यांना (Farmer) पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी मध्यरात्री तसेच अवेळी कधीही लाईट येत असल्यामुळे घरापासून दूर असलेल्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी जाणे शेतकऱ्यास शक्य होत नाही, आणि वीज वितरण विभागाच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. चोवीस तासांपैकी कमीत कमी 13 ते 14 तास तरी वीज उपलब्ध व्हावी; अशी मागणी शेतकर्‍यांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने

Pink E- Rickshaw Scheme: पिंक रिक्षा योजना काय आहे? कोणाला मिळते ही रिक्षा

Ghashiram Kotwal: 'घाशीराम कोतवाल' हिंदी रंगभूमीवर; ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा झळकणार मुख्य भूमिकेत

Madhuri Elephant : माधुरी हत्तीला गुजरातला हलविल्याचा निषेध; जैन समाजाकडून आंदोलन, रिलायन्स उत्पादनावर बहिष्काराचा केला ठराव

Malegaon Blast Verdict: दहशतवाद आणि जिहादचा रंग हिरवाच; मालेगाव खटल्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT