नांदेड : हाता तोंडाशी आलेलं पिकं डोळ्यासमोर वाहून गेल्याने शेतकरी महिलेनं आता जगून तरी काय करु, असे म्हणत अक्षरशः हंबरडा फोडला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पोखर्णी या ठिकाणी ही घटना मनाला चटका लावणारी आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे देखील पहा-
व्हिडीओ मध्ये दिसणारी ही महिला पोखर्णी गावची राऊबाई चाटे आहे. राऊबाई, पती आणि विधवा सुनेसह ते राहत आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राऊ बाईचे साडेतीन एकर मध्ये असलेले सोयाबीन वाहून गेले आहे. स्वतःच्या लेकराप्रमाणे जपलेले हे पिकं क्षणार्धात वाहून गेल्याने राऊबाईचे अश्रु अनावर झाले आहेत. खरीप पिकांवर बळीराजांचे वर्षाचं आर्थिक गणित अवलंबून असतं.
मात्र, हजारो रुपये खर्च करुन देखील आता हाती काहीच लागणार नाही, म्हणून राऊबाईने हंबरडा फोडला आहे. जिल्हयात पावसाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवल्याने अनेक शेतकऱ्यांची अवस्था राऊबाई प्रमाणे झाली आहे. त्यामुळे पिकं विम्यावर भरवसा राहिला नसल्याने मायबाप सरकारच्या मदतीकडे बळी राजाचे डोळे लागले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.