Bhandara Rain Saam tv
ऍग्रो वन

Bhandara Rain Update: बळीराजाची चिंता वाढतेय..भंडारा जिल्ह्यात पावसाने फिरविली पाठ

Bhandara News शेतकरी चिंतेत.. भंडारा जिल्ह्यात पावसाने फिरविली पाठ

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यात शेतकरी संकटात सापडला आहे. मागील १५ दिवसापासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने (Bhandara) शेतात जमिनीला भेगा पडून धान पीक करपायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी (Farmer) चिंतेत असून आभाळाकडे नजरा आहे. (Live Marathi News)

भंडारा, गोंदिया जिल्हा हा धानाचा कोठार म्हणून ओळखला जातो. येथील ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग राहत असून पावसाळा लागताच शेतकऱ्यांनी धान पीक लागवड केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही वरुणराजा (Rain) कृपा करेल व धानपिक बहरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण मागील १५ दिवसापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेली धान पीक करपत असून शेतीमध्ये मोठं मोठ्या भेगा पडू लागल्याने शेतकरी राजा विवंचनेत सापडला आहे.  

तर कर्ज वाढेल 

आधीच कसा बसा उसण उधार करून शेतीत धान पीक लागवड केली. मग आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर आणखी कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकशान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT