Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : आंब्याच्या बागेतून ८ लाख रुपयांचे उत्पन्न; शेतकऱ्याचे आदर्श व्यवस्थापन

Beed News : बीडच्या आष्टी तालुक्यातील शिरपूर येथील सावनकुमार कल्याणराव तागड हे उच्चशिक्षित असून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असताना उपलब्ध पाण्याचा योग्य वापर केल्याने बीडच्या आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील शेतकऱ्याने दोन एकर शेतीतून तब्बल ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. अर्थात दुष्काळी परिस्थितीत देखील पाण्याचे योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेत आहेत. 

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील सावनकुमार कल्याणराव तागड हे उच्चशिक्षित असून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच त्यांनी आंब्याची लागवड केली. यासाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला असून आता यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत (Farmer) आहे. झाडांना फळ धारणा चांगल्या प्रकारे झाल्याने केलेल्या मेहनतीचा उपयोग होत आहे. 

यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही ठिबक सिंचनच्या माध्यमातून त्यांनी (Mango) आंब्यांना पाणी दिले. याचे चांगले परिणाम आता दिसत असून त्यांना यावर्षी तब्बल ८ लाख रुपये यातून मिळणार आहेत. तर ग्रामीण भागातील तरुणांनी देखील छोट्या मोठ्या नोकरीसाठी शहराकडे धाव न घेता गावातच आपल्या शेतात वेगळा प्रयोग करून चांगले उत्पन्न घ्यावे; असे देखील आवाहन तागड यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT