अकोल्यात पावसामुळे सोयाबीन भिजले; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान अॅड. जयेश गावंडे ...
ऍग्रो वन

अकोल्यात पावसामुळे सोयाबीन भिजले; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

अकोला जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यात रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठिकठिकाणी साठवून ठेवलेली सोयाबीनची सुडी भिजली आहे. वेचणीला आलेला कापूसही देखील ओला झाला आहे. अकोला जिल्ह्यात अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर अशा सर्वच तालुक्याला रात्री पावसाने चांगलेच झोडपले आहे.

हे देखील पहा-

अकोल्यातील दहिगाव गावंडे परिसरात गावातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून शेतात गंजी करून ठेवली होती. रात्रभर आलेल्या पावसामुळे सोयाबीन ओले झाले आहे. याचा फटका या पिकाला बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वेगाचा वारा, विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सध्या सर्वत्र सोयाबीन सोंगणी आणि मळणीचा हंगाम जोरावर सुरू आहे. कापूस देखील वेचणीला आलेला आहे. अशातच हा कालच्या झालेल्या पाऊसाने मोठी अडचण तयार झाली आहे. सततच्या पावसाने सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब निघण्याची भीती शेतकऱ्यांनमध्ये निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT