हर्षदा सोनोने
अकोला : अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त (Farmer) शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या शेतकऱ्यांना अजून पर्यंत (Akola) पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. (Live Marathi News)
अतिवृष्टी व अवकाळी पावसाने अकोला जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांत पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत पीक विमा योजनेत सहभागी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना भरपाईच्या २५ टक्के अग्रीम विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली होती. यामुळे नुकसान भरपाई मिळेल या आहेत शेतकरी आहेत.
सोयाबीनच्या सुमारे २ लाख १५ हजार हेक्टर संरक्षित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन कृषी विभाग व महसूल विभागाने (Crop Insurance) पाहणी केली होती. तर बरेच दिवस उलटून गेले. तरी त्या नुकसानीचा अग्रीम अद्यापही शेतकऱ्यांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही अग्रीम विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.