
चेतन व्यास
वर्धा : वर्ध्याच्या सालोड (हिरापूर) परिसरात कालव्याचे खोदकाम करण्यात आले. रब्बी हंगामाच्या तोंडावर खोदकाम केल्याने शेतकऱ्यांना (Farmer) पाणी मिळण्यास अडचण निर्माण झालीय. त्यामुळे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच मुक्काम (Wardha) करत दोन रात्री थंडीतच काढल्यात. प्रशासनाने नुकसान भरपाईबाबत लेखी पत्र द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. (Maharashtra News)
सालोड शिवारात वर्धा- नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाकरिता निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे खोदकाम करण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पान शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पाणी मिळण्यास अडचण आल्याने नुकसानीची भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खड्ड्यातच ठिय्या
शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कालव्याच्या खोदकाम केलेल्या खड्ड्यात ठिय्या आंदोलन सुरू केल. प्रशासनाकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळीच अंथरूण, जेवण बोलावून रात्र काढली. प्रशासनाने याबाबत तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.