सांगली : नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा (insurance) योजना सक्षम करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिला आहे. ते सांगलीच्या मिरज तालुक्यातील लींगणूर येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्यासाठी आले हाेते. त्यावेळी शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील ६० ते ७० हजार एकर वरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. घडकुज, दावन्या आदीसह अन्य कारणांनी संपूर्ण द्राक्ष बगाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. यामुळे एकरी चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा साडेचार हजार कोटीचा आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ,धीर देणे आणि पाहणी करण्यासाठी शेट्टी रविवारी मिरज पूर्व भागात आले होते. त्यावेळी शेट्टी यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी. अन्यथा रस्त्यावर उतरू असे नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.