पश्चिम विदर्भातील ८८ हजार हेक्टरमधील संत्र्याला उष्माघाताचा धोका

सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे.
Akola News Updates, Vidarbha News Updates
Akola News Updates, Vidarbha News Updatesअरुण जोशी

अमरावती - यंदाचा उन्हाळा सर्वाधिक उष्ण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला विदर्भातील संत्रा पुन्हा संकटात सापडला आहे. संत्राची काही भागात आंबियाची गळ होत आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील ८८,८४८ हेक्टरमधील संत्रा बागांमध्ये व्यवस्थापन नसल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान १०० कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. सध्या दिवसाचे तापमान ४२ अंशांवर गेले आहे. (Akola News Updates)

हे देखील पहा -

अद्याप मे व जून शिल्लक आहे. उष्ण तापमानामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू फळबागांमध्ये कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची गळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर, कोवळ्या रोपांचे शेंडे वाळणे, पाने गळणे, आदी दुष्परिणाम दिसू लागले आहेत. तर या उन्हापासून संत्रा झाडावर टिकवने कठीण झाले असून संत्रा गळ मोठ्या प्रमाणावर होत आहे अशी प्रतिक्रिया अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील संत्रा उत्पादक शेतकरी सुधीर वानखडे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com