Onion Export News: खरेदी नको, निर्यातबंदी उठवा; कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक

Onion Export News Today: नाफेड, एनसीसीएफ मार्फत प्रत्येकी अडीच लाख प्रमाणे एकूण 5 लाख टन उन्हाळ कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. येत्या मेपासून प्रत्यक्ष कांद्याची खरेदी सुरू होईल.
Onion Farmers Demand Central Government To Remove Export Ban
Onion Farmers Demand Central Government To Remove Export BanSaam Digital

Onion Farmer News:

नाफेड, एनसीसीएफ मार्फत प्रत्येकी अडीच लाख प्रमाणे एकूण 5 लाख टन उन्हाळ कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. येत्या मेपासून प्रत्यक्ष कांद्याची खरेदी सुरू होईल. मात्र या निर्णयाला विरोध होत आहे. कांदा खरेदी ऐवजी केंद्रानं कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी होतेय. नाफेड, एनसीसीएफ मार्फत केली जाणारी कांदा खरेदी थेट बाजार समितीतून होत नसल्यानं शेतकऱ्यांनी विरोध केलाय.

कांदा खरेदीपेक्षा केंद्रानं निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अशी मागणी शेतक-यांमधून होतेय. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र या खरेदीत पारदर्शकता नाही, शेतकऱ्यांना या खरेदीचा काहीच लाभ होत नसल्याचं कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.

Onion Farmers Demand Central Government To Remove Export Ban
Sangli Lok Sabha: अडचण होत असेल तर उमेदवारी मागे घेणार, चंद्रहार पाटील यांचं मोठं वक्तव्य

केंद्र सरकारनं नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ला कांदा खरेदीची परवानगी दिली आहे. त्याआधारे दोन्ही प्रमुख खरेदीदार संस्थांचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची नाशिकमध्ये बैठक झाली. देशभरातून एक हजार कोटी रुपयांचा कांदा खरेदी करून त्याचे पैसे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक झाल्यास थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराही या वेळी दिला गेला.

केंद्र सरकारने डिसेंबर 2023 मध्ये अचानक 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी केली. त्यामुळे कांद्याच्या दरात सातत्यानं घट झाली. या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. 31 मार्चनंतर निर्यात बंदी उठेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्यानं शेतकरी संतप्त आहेत.

Onion Farmers Demand Central Government To Remove Export Ban
PM Modi Interview: 'वन नेशन, वन इलेक्शन'वर नरेंद्र मोदी यांनी केलं मोठं वक्तव्य

दरम्यान, गेल्या वर्षी या दोन्ही संस्थांनी सात लाख टन कांद्याची खरेदी केली होती. मात्र पारदर्शकतेचा अभाव, कांदा विक्रीपश्चात वेळेवर मिळत नसलेला पैशांचा परतावा तसेच व्यापारी खळ्यावर खरेदीची काही प्रकरणे चर्चेत आली होती. मोठा सावळा गोंधळ असल्याने शेतकऱ्यांचा या खरेदीवर विश्वास नसल्याचे वास्तव आहे. कांदा आणखी किती दिवस बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणणार हाच खरा प्रश्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com