सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. या (Nandurbar News) नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार आहेत. यानंतर शेतकऱ्यांला (farmer) सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Tajya Batmya)
नंदुरबार जिल्ह्यात सलग सात दिवस अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पूर्णतः हिरावला गेला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा, या पिकांसोबतच फळबागातील टरबूज, पपई, केळी यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे.
क्षेत्र वाढण्याची शक्यता
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारने लवकर मदत करून शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावा एवढी विनंती आता शेतकरी करू लागले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.