सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरात शनिवारी अचानक अवकाळी (Nandurbar) पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे (Farmer) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने वादळी पावसामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Maharashtra News)
नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील नारायण पवार या शेतकऱ्यांचा तोडणीला आलेल्या केळी पिकाचे झाडे हे भुईसपाट झाले आहे. नारायण पवार यांनी लागवड केलेल्या ७ हजार झाडांपैकी दीड हजाराहुन अधिक केळीचे खाम कोलमळले असून अडीच ते तीन लाखांच नुकसान झाले आहे.
येत्या काही दिवसातच केळीचे उत्पन्न निघणार होते. मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी; अशी विनंती आता शेतकरी करू लागले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.