Nanded : अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग!

यंदा अतिवृष्टी आणि करपा रोगामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील एका केळी उत्पादक शेतकऱ्याने बागेतील दिड हजार केळीची रोपटी अक्षरशः तोडून टाकली.
अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग!
अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग!संतोष जोशी

नांदेड : यंदा अतिवृष्टी आणि करपा रोगामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील एका केळी उत्पादक शेतकऱ्याने बागेतील दिड हजार केळीची रोपटी अक्षरशः तोडून टाकली. शैलेश लोमटे असे या आर्थिक संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.

हे देखील पहा :

लोमटे यांनी केळी लागवडीवर एक लाख रुपये खर्च केला आणि त्यांना तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं मात्र करपा आणि अतिवृष्टीनं संपूर्ण केळी खराब होत असल्याने केळीची संपुर्ण रोपटी तोडून टाकली आहेत. जिल्हयातील अर्धापूर, मूदखेड, हदगाव, भोकर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते.

अतिवृष्टीचा फटका; शेतकऱयाने तोडून टाकली केळीची बाग!
मुद्द्यांना डायव्हर्ट करण्यासाठी 'किरीत तोमय्या' सारखी माणसे प्रत्येक राज्यात आहेत : पटोले

अतिवृष्टीमुळे केळीचे मोठे नुकसान होत असतानाच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केळी परिपक्व होण्याअगोदरच पिवळी पडत असल्याने शेतकरी हवालदील झालाय. लोमटे यांच्या प्रमाणे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पिकवलेली केळीची बाग उद्धवस्त कारण्याशिवाय पर्याय उरला नाही. केळी उत्पादक शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com