पावसाने ओढ दिली? घाबरू नका असे वाचवा पिक; कृषी तज्ञांचा सल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी (Farmer) वर्ग चिंतेत पडला आहे.
पावसाने ओढ दिली? घाबरू नका असे वाचवा पिक; कृषी तज्ञांचा सल्ला
पावसाने ओढ दिली? घाबरू नका असे वाचवा पिक; कृषी तज्ञांचा सल्लाSaam Tv
Published On

कैलास चौधरी

उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी (Farmer) वर्ग चिंतेत पडला आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता या पिकांची फवारणी करून पीक वाचवू शकतो अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे.

पावसाने ओढ दिली? घाबरू नका असे वाचवा पिक; कृषी तज्ञांचा सल्ला
वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात

जिल्ह्यात खरिपातील सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची आहे. या बरोबरच इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे, मात्र गेल्या वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात आहेत. सध्या पिकांना फुले आणि शेंगा भरण्याची स्थिती असून आता पावसाची नितांत गरज आहे. मात्र शेतकऱ्यांनी काळजी घेतल्यास ही पीके अजूनही दहा ते पंधरा दिवस तग धरू शकतात त्याबाबत कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन करण्यात येते आहे.

राज्यात सुरुवातीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परतू आता संपुर्ण महाराष्ट्रातच पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरु झाला आहे. परंतू त्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. आता अशा कृषी तज्ञांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना महत्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com