शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात!

उत्पन्न घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत..
शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात!
शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट; वातावरण बदलामुळं पिकं धोक्यात!SaamTvNews

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवलं आहे. ढगाळ वातावरण बदलामुळं उन्हाळी पिकं धोक्यात आली आहेत. बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळं शेतातील सोयाबीन, कांदा, बाजरी, भुईमूग या पिकांसह (Crops) कलिंगड, खरबूज, टोमॅटो, भेंडी, गवारी, आंबा, मोसंबी शेतपिक व फळबागाला याचा फटका बसलाय. त्याचबरोबर पिकावर मावा आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. यातच अवकाळी भुरभुर पावसामुळं व वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाजरी पीक जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळं पुन्हा एकदा उत्पन्न घटण्याची शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com