
अमर घटारे
अमरावती : पावसाचा लहरीपणा यामुळे नापिकी होते. यातून वाढणारा कर्जाचा बोजा, या विवंचनेत शेतकरी (Farmer) असतो. यातून टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत असतो. याच कारणातून (Amravati) अमरावती विभागात जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यात तब्बल ७३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Breaking Marathi News)
अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अकोला या पाच जिल्ह्याच्या शेतकरी आत्महत्याच्या या आकडेवारीने मात्र चिंता वाढली आहे. यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. तर मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. यवतमाळ व बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाही. यामुळे शेतकरी संकटात आहे.
अमरावती जिह्यात सर्वाधिक आत्महत्या
पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरम्यान अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मागील वर्षी एकट्या अमरावती जिल्ह्यात ३४८ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.