कांद्याला पाणी द्यायला गेला अन् परत आलाच नाही; विजेच्या तारेने घेतला जीव

मात्र सकाळी शेतात चक्कर मारण्यासाठी रामेश्वरचे चुलते गेले असता सर्व घटना समोर आली.
कांद्याला पाणी द्यायला गेला अन् परत आलाच नाही; विजेच्या तारेने घेतला जीव
कांद्याला पाणी द्यायला गेला अन् परत आलाच नाही; विजेच्या तारेने घेतला जीवSaam TV
Published On

अविनाश कानडजे

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात (Aurangabad) मनाला हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणाला शेतात लोमकळणाऱ्या विजेच्या तारांचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. दुसऱ्या दिवशी या तरुणाचे चुलते शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता धक्कादायक घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथील रामेश्वर रिठ्ठे हा 19 वर्षीय तरुण शेतात लावलेल्या कांद्याला पाणी भरण्यासाठी गेला होता. मात्र बाजूलाच असलेल्या शेतातील ज्वारीच्या पिकात लोमकळणाऱ्या ताराचा अंदाज न आल्याने त्याच्या मानेला विजेच्या तारेचा स्पर्श झाला ज्यात रामेश्वर चा जागीच मृत्यू झाला. मात्र नेहमीप्रमाणे रात्री मुलगा पाणी भरत असेल म्हणून कुटुंबातील सदस्यही झोपी गेले. मात्र सकाळी शेतात चक्कर मारण्यासाठी रामेश्वरचे चुलते गेले असता सर्व घटना समोर आली.

कांद्याला पाणी द्यायला गेला अन् परत आलाच नाही; विजेच्या तारेने घेतला जीव
कालिचरण बाबा विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड उपस्थित

रामेश्वरच्या मृत्यूला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. तर रामेश्वरचा मृतदेह वैजापूरच्या महावितरण कार्यालयासमोर ठेवून नातेवाईकांनी ठिय्या करत, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणी केली होती. त्यानुसार एम.एस.इ.बी. चे वायरमन भुजाडे, सब स्टेशन येथील कनिष्ठ अभियंता गव्हाड आणि उप अभियंता राहुल बडवे यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com