Video : दिल्लीत जावून खुर्च्या टिकवता..कांद्याचा विषय मांडायला वेळ नाही; जयंत पाटील यांचा टोला

Jayant Patil On Ajit Pawar : खुर्च्या टिकवण्यासाठी दिल्लीला जाता मग कांदा उत्पादकांची बाजू मांडायला वेळ मिळाला नाही नाही का?, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

कांदा निर्यातीचा लोकसभेला जोरदार झटका लागलेला आहे, त्यामुळे कंबर मोडायची वेळ आलेली आहे, चूक झाली माफ करा, असं म्हणत अजित पवारांनी नाशिकमधून शेतकऱ्यांची माफी मागीतली आहे. खुर्च्या टिकवण्यासाठी दिल्लीला जाता मग कांदा उत्पादकांची बाजू मांडायला वेळ मिळाला नाही नाही का, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. जो काम करतो तोच चूकतो, जो कामच करत नाही तो कशाला चुकेल, असंही अजित पवार म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना दिल्लीच्या विरोधात बोलायच्याऐवजी नाशिकमध्ये जावून माफी मागण्याची वेळ आली. कांदा उत्पादकांची बाजू घेऊन दिल्लीला जाऊन बोला. तुमच्या खुर्च्या टिकवण्यासाठी १० वेळा दिल्लीला प्रवास करता, मात्र कांद्याचा विषय मांडायला तुम्हाला वेळ मिळाला नाही, असा टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com