पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राजगुरूनगरच्या पाईट परिसरात हा पाऊस पडला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे आंब्याला मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेला आंबा खाली पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त राजगुरूनगर नाही तर पिंपरी चिंचवड आणि कोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.