Uddhav Thackeray On Ambadas Danve: अंबादास दानवेंचं निलंबन म्हणजे षडयंत्र, ठाकरे स्पष्टच बोलले!

Maharashtra Politics: विधान परिषदेत 1 जुलै रोजी अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केली होती.दरम्यान त्यावरुन दानवेंचं निलंबन करण्यात आलं.

उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.काल पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.अनिल परब हे मुंबई पदवीधरसाठी निवडून आले.त्यासाठी सर्व जनेतेचे पत्रकार परिषदेत ठाकरेंनी आभार मानले.दरम्यान काल विधान परिषदेत घडलेल्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलं.विधान परिषदेत अंबादास दानवेंना शिवीगाळ प्रकरणी निलंबित करण्यात आलं,हे चुकीचं आहे.दानवेंना बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती,असं ठाकरे यावेळी म्हणाले.दरम्यान दानवेंचं निलंबन हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे.यावेळी अर्थसंकल्प म्हणजे चिरफाड करायला सुरुवात झाली आहे,असा घणाघात ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com