Uddhav Thackeray यांचं निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकास्त्र, गंभीर आरोपही केले
उद्धव ठाकरे यांनी आज मतदानाच्या दिवशी तातडीची पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे. अनेक मतदारांना मतदानपासून वंचित राहावं लागत आहे. तर काही ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय संथ असल्याच्या तक्रारी आहेत. यावरून ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लोकसभा निवडणूक मतदानाला अवघे काही तास उरले असताना, अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदान केंद्रांवर होणाऱ्या विलंबावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाकरे यांनी यावेळी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू असल्याचा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला. रांगेत उभे असलेल्या मतदारांनी मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नये, असं आवाहनही त्यांनी केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.