रत्नागिरीतल्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी अखेर पक्षाला रामराम केला आहे. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, उदय सामंत यांचा साळवींच्या शिवसेना प्रवेशाला विरोध असल्याची चर्चा होती. पण त्या चर्चेला स्वतः सामंत यांनी पूर्णविराम दिला आहे.
याबाबत उदय सामंत यांनी साळवींच्या प्रवेशाबाबत माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर राजन साळवींशी अनेकदा चर्चा झाली होती. पण काही अडचणींमुळे ते शिवसेनेत येऊ शकले नाहीत. त्या मतदारसंघात माझे मोठे बंधू शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत निवडून आले. दोन चार दिवसांपूर्वी माझी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. शिंदे आणि किरण सामंत यांचीही चर्चा झाली. राजन साळवींनी आज राजीनामा दिला आहे. आजच रात्री शिंदेंसोबत बैठक आहे. राजन साळवी, किरण सामंत हे देखील या बैठकीला उपस्थित असतील. त्यात एकत्रित चर्चा करून निर्णय घेतला जाईल. राजन साळवींनी पक्षात येऊ नये, त्यांनी खोडा घातल्याचं वृत्त होतं. पण त्यात काहीही तथ्य नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले. राजन साळवी हे पक्षात आले तर, त्यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.