सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या संभाव्य चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असून राज्यात ठिकठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी देखील पाहायला मिळते आहे. मागील काही दिवसांमध्ये मनसैनिक आणि शिवसैनिक हे देखील एकत्र आल्याचे दिसून आले. तसेच जनतेच्या मनात जे आहे ते नक्की होईल असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी काल देखील दुसऱ्यांदा केल्याने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. अशातच मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देवदर्शनासाठी सोलापूर गेले असता त्यांची तेथील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भेट घेत दोन्ही बंधु एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, महाभारतात एक वाक्य आहे की समय बडा बलवान होता है! तसेच मी देखील राज ठाकरे यांना त्यांच्या मनात काय आहे ते विचारले मात्र, मलाही अजून त्याचे उत्तर मिळाले नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.