गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केले होते. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत, आमच्यातले वाद हे क्षूल्लक आहे.
त्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणात राज ठाकरे यांच्या विधानाचे स्वागत केले होते. त्यानंतर मनसैनिक आणि शिवसैनिकांनी चौकाचौकात राज आणि उद्धव ठाकरे यांचे बॅनर लावले. अशातच दोन्ही नेत्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे म्हणत एक ग्रीन सिग्नलच दिला.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेची बैठक पार पडली. यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. मागच्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि कंगना रनौत या परप्रांतीयांची राज्यात दादागिरी वाढली आहे. कारण दोन भावांमध्ये फुट पडली आहे. या दोन भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवावा. तसेच महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅंड टिकला पाहिजे अशी इच्छा मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.