कल्याण: शालिमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करत असलेल्या एका आरोपीला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. शिराज खलील खान (वय ३४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा आहे आणि सध्या वेल्डिंगच्या कामासाठी ओडिशामध्ये राहत होता.
आज पहाटे साडेपाच वाजता शिराज खान शालिमार एक्सप्रेसने कल्याण स्टेशनवर उतरला. त्यावेळी स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे ८.५ किलो गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ६९ हजार रुपये असल्याची माहिती आहे.प्राथमिक चौकशीत शिराज खानने हा ओडिसा येथून आणला असून ती भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.