संगमनेरमध्ये आज शेतकऱ्यांचा भाकड जनावरांच्या प्रश्नी संताप उसळला. शिवआर्मी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आपल्या जर्सी गोऱ्ह्यांसह प्रांत कार्यालयावर धडकले. शेतकरी प्रचंड आक्रमक झाले असून पोलिसांनी लावलेले बॅरिकेट हटवून थेट प्रांत कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. या आंदोलनामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून प्रांत कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
भाकड जनावरे शासनाने सांभाळावीत
सरकारने गोहत्याबंदी कायद्यात सुधारणा करावी
या प्रश्नावर शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.