Video: मनोज जरांगेंचं आरक्षणावर समाधान नाही; Raosaheb Danve नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ..
मनोज जरांगे पाटील यांनी 13 ऑगस्टपर्यंत सरकारला आरक्षणासाठी पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. अल्टिमेटम संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना, जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु केलाय.आम्हाला कायद्याच्या चौकटीत जेवढे आरक्षण देता येत होतं तस आम्ही दिलाय. त्याच्यावर त्यांचं समाधान नाही आहे . त्यांना त्यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिलीय.महाविकास आघाडीला लोकसभेला जास्त मते पडलीत त्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी जरांगे जरांगेंच्या मताप्रमाणे ओबीसीतून आरक्षण देण्याचं जाहीरनाम्यात टाकावं.असं आव्हान देखील रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला दिलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.