Maharashtra Politics : भाजप-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? फडणवीसांची स्पष्ट भूमिका | VIDEO

BJP- Thackeray Group : भाजप आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे.

२०१९ नंतर वेगळे झालेले भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा अधूनमधून राजकीय वर्तुळात सुरू होतात. कालांतरानं त्या चर्चांना पूर्णविराम दिला जातो. निवडणुका आल्या की पुन्हा भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चांना उधाण येतं. आगामी काळात राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळं सहाजिकच पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा हीच चर्चा सुरू झाली. या चर्चेला अलीकडेच उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या एका भेटीनं फोडणी मिळाली होती. आता या राजकीय चर्चेवर स्वतः भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आमच्यातील संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, असं सांगताना त्यांनी 'ना दोस्ती, ना युती' असेच स्पष्ट संकेत दिले आहेत.

फडणवीस म्हणाले की, 'उद्धव ठाकरे आणि माझी विधानसभा निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणीच भेट झाली आहे. त्याच्याव्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही. समोरासमोर भेट झाली की नमस्कार नाही करायचा, असे आमचे संबंध कधीच नव्हते. आम्ही भेटतो, नमस्कार करतो. दोन चांगल्या गोष्टी बोलतो. संबंध आहेतच. ते खूप खराब आहेत, अशी परिस्थिती नाही. याचा अर्थ आम्ही एकत्र येतोय किंवा त्यांना आमच्यासोबत घेणार आहेत, असे काही नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com