राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारने जनतेला केवळ आश्वासनाचं गाजर दाखवल आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच त्या गाजराचा हार देखील घेऊन आल्या होत्या.
महायुती सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला आतापर्यंत फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आता त्यांना विसर पडला आहे. आम्ही हे आश्वासन दिलच नव्हतं, आम्ही हे संगीतलच नव्हतं अशी त्यांची वक्तव्य आहेत अशी टीका करत त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला भर पत्रकार परिषदेत गाजरांचा हार घातला. महाराष्ट्राच्या जनतेला जी गाजरं यांनी दिली त्याच गाजरांनी त्यांचा सत्कार करतो आहोत असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.