Manoj Jarange : वडीगोद्री प्रकरणी जरांगेंचं मोठं वक्तव्य !

Maratha Reservation : तुम्ही त्या गावातून येताना शांत या, असं म्हणत हाकेंचा हिशोब करणार असल्याचा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे.

'आंतरवलीचा रस्ता वडीगोद्रीतून जातो. आम्ही त्याच रस्त्याने जाणार. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. तुम्ही त्या गावातून येताना शांत या', असं म्हणत हाकेंचा हिशोब करणार असल्याचा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे.

वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलकांमधील वातावरण तापलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी हे महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. तुम्ही त्या गावातून येताना शांतते या, असं म्हणत जरांगे यांनी भुजबळ आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, 'इकडे मी मरणाच्या दारात बसलो आहे. समाज बांधवांनी जर बंद ठेवला असेल तर तो शांततेत पार पाडावा. मी खंबीर आहे, पण सध्या दम धरा, असे आवाहन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com