मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू ठेवलं आहे.
राज ठाकरे यांनी आंदोलनावर टीका केली आणि शिंदेंनी प्रश्न सोडवला होता, मग आंदोलनाची गरज काय असा सवाल केला.
जरांगे पाटलांनी राज ठाकरे यांना सडकून प्रत्युत्तर दिलं.
मराठा समाजाची मागणी कायम. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवेच.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानावर त्यांनी अन्न - पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
'दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. हा विनाकारण मराठ्यांमध्ये पडतोय. विधानसभेत फडणवीसांनी तुमचा गेम केला. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरगं आहे. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेले. तर मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. खेडेगावात याला कुचक्या कानाचं म्हणतात', असं जरांगे पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.