Maratha Reservation : मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम; अन्यथा २९ सप्टेंबरपासून उपोषण, VIDEO

Manoj Jarange on Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. जरांगे पाटील यांनी २९ सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.

जालना : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. मात्र, मराठा आंदोलकांनी उपोषणाला विरोध केला आहे. यामुळे आंतरवाली सराटी घेतलेल्या बैठकीत गोंधळ झाल्याचे दिसून आले.

मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच राज्य सरकारला नवा इशारा दिला आहे. 'देवेंद्र फडणवीस,आम्ही पुन्हा एकदा मुंबईतला येणार आहे. २९ सप्टेंबरच्या आत सरसकट आरक्षण देण्याची मागणी पूर्ण करा. २००४ चा जीआर आहे. त्यात दुरुस्ती करा. अटीशर्ती शिथिल करा. हैदराबाद,सातारा आणि बॉम्बे गारमेंटचे गॅझेट २९ सप्टेंबरपर्यंत लागू करा. आंतरवालीसह राज्यातील सरसकट गुन्हे मागे घ्या, तुम्हाला हे शेवटचं सांगणं आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com