
एकीकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरलेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा जरांगेंनी केलीये. यावेळी फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.
आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जरांगेंनी केली होती. मात्र ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर आता पुन्हा जरांगे उपोषणाची भाषा करतायेत. महायुती सरकारची स्थापना होताच जरांगे पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्यानं राज्यात पुन्हा आरक्षणाचा संघर्ष सुरू होणार यात शंका नाही. मात्र यात मनोज जरांगेंनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानं हे उपोषण सरकारची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.