सातारा जिल्ह्यात सध्या महायुतीमध्ये खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकमेकांच्या मतदार संघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या शीतयुद्धाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे. काही दिवसापूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघात बावधनमध्ये एका कार्यक्रमात उपस्थिती लावून मंत्री मकरंद पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. यावेळी त्यांनी कुणीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाही. त्याला आंब्याची सावली लागते, बावधन गावाची ताकद राजकारण बदलवण्याची आहे आजची सभा परिवर्तनाची असल्याचे सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता मंत्री मकरंद पाटील यांना डिवचले होते. त्यावरून आता मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मी दोन, तीन हजारांनी निवडून आलो नाही, मी माझा पक्ष वाढतोय.', असं म्हणत मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरेंना टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.