राज्यात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, कारण राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. 'याच पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते', अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आजपासूनच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुका एकूण तीन टप्प्यांत होण्याची शक्यता असून, यात २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.