Maharashtra Politics: 'माझं काही खरं नाही' जयंत पाटील यांच्या विधानाने राजकारणात खळबळ, VIDEO

Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव खूपच चर्चेत आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

जयंत पाटील हे सत्तेत म्हणजेच महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. या सगळ्या चर्चा सुरु असतानाच जयंत पाटील यांनी एक विधान केले ते होते. माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, अस सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर ते पक्षात नाराज आहेत का? हा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जाऊ लागला.

काही दिवसापूर्वीच जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यकर्माच्या उद्घाटनासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित केले होते. आता त्यांचे हे वक्तव्य यामुळे जयंत पाटील त्यांच्या पक्षात नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांचा पक्ष बदलण्याची वेळ ही घडयाळ कधी दाखवते हे बघणे आता औत्सूक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com