VIDEO : 'सरकारने सर्वांना पगार देणं बंद करा!' भुऱ्याचा सरकारला सल्ला!

Jalna Bhurya Viral Speech : 'सरकारने सगळ्यांना पगार सुरू केला हे बंद करा, अशाने आळशी पिढी तयार होईल, मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील' अशा शब्दांत जालन्याच्या भुऱ्याने सरकारला सल्ला दिला आहे.

'सरकारने सगळ्यांना पगार सुरू केला हे बंद करा, अशाने आळशी पिढी तयार होईल, मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील' अशा शब्दांत जालन्याच्या भुऱ्याने सरकारला सल्ला दिला आहे.

'मोठाल्या पोरांना सरकार ने पगार सुरू केलाय, आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं?' आम्हाला सुद्धा खर्चा पाण्याला पैसे लागतात, असं म्हणत कार्तिक वजीर याने सरकारकडे सरसकट मुलांना पगार सुरू करण्याची मागणी केलीय.

तर आज स्वातंत्र्यदिनी बारक्या पोरांना अजून खरंच स्वातंत्र्य आहे का? असा प्रश्न विचारला आहे.सुट्टी असली की घरचे काम, रानातले काम, स्वातंत्र्य नावाला काही गोष्ट आहे की नाही.'आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले मोठाले माणसं' असं म्हणत त्याने लहान मुलांच्या स्वातंत्र्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. तर स्वातंत्र्यदिनी भुऱ्याने केलेलं हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com