Video: जलजीवन मिशनची 90% कामं बोगस, सत्ताधारी आमदाराचा गंभीर आरोप
Hingoli News: केंद्र शासनाने प्रत्येक गावातील नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलजीवन मिशन योजना कार्यान्वित केली. या योजनेवर करोडो रुपयांचा निधी खर्च करून अनेक गावात विहिरी नवीन जलवाहिनी यासह महाकाय जलकुंभ उभारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यात केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या या जलजीवन मिशनमध्ये योजनेमध्ये अधिकारी व कंत्राटदारांनी संगणमत करून 90% कामे बोगस केल्याचा आरोप भाजपचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी माध्यमांसमोर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक फायदा व्हावा यासाठी या योजनेत बदल करण्यात आल्याच देखील मुटकुळे म्हणाले आहेत. दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्र शासनाकडे देखील यासंदर्भात लेखी तक्रार दाखल करणार असून कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी देखील करणार असल्याचं यावेळी मुटकुळे म्हणाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.